क विता म्हणजे निरर्थक बडबड नाही. कविता म्हणजे शब्दांचा फापटपसाराही नाही. शब्दांपुढे शब्द उभे केले की कविता होत नसते, कविता हा अतिशय दुर्घट असा साहित्यप्रकार आहे. सर्व प्रकारच्या कलेचे मुळ कवितेमध्ये आहे. ज्यांना खोल गुहेतला गुढ अंधार पाहता येतो, ज्यांना माणूस, निसर्ग आणि स्वतःबरोबर नाते जोडता येते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना हाका ऐकू येतात तेच उत्तम कविता लिहू शकतात. कवीचे कान नेहमी जमिनीला टेकलेले असावेत. जमीन आतून कायम कुस बदलत असते. तिच्या आतून कधी लाव्हा उफाळून बाहेर येतो तर कधी धरणीकंप होतो. कवीला माता आणि माती यांच्या गर्भाचा अंदाज असावा. - कवी सायमन मार्टिन संकलन : संभाजी हरिभाऊ रोडगे